https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

जिल्हा प्रशासन अर्थ, स्वरूप, वैशीष्टे, अधिकार आणि कार्य


जिल्हा प्रशासन अर्थ, स्वरूप, वैशीष्टे, अधिकार आणि कार्य

जिल्हा हा घटक ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी निर्माण  केलेला आहे. जिल्हा प्रशासनाचा विकास ब्रिटिश काळात झाला. जिल्हा शब्दाचा अर्थ जाणून घेण्यासाठी शब्दाची उत्पत्ती लक्षात घेणे आवश्यक असते. 'District' या शब्दाला मराठीत 'जिल्हा' असे म्हणतात. हा शब्द लॅटिन भाषेतून आलेला आहे त्याचा वापर न्यायदानाच्या क्षेत्रात केला जात असे. लॅटिन भाषेत हा शब्द फ्रान्समधील 'प्रिफेक्ट'  व्यवस्थेच्या प्रभावातून स्वीकारला गेला. इंग्रजांना बक्सारची लढाई नंतर बंगाल, बिहार आणि ओरिसा प्रांताचे दिवाणी अधिकार मिळविले.या अधिकाराच्या अंतर्गत कलकत्त्याच्या दिवाणी संदर्भात 'जिल्हा' हा शब्द सर्वप्रथम प्रचारात आला. गव्हर्नर जनरल वाँरन हेस्टिंग्ज यांनी सर्वप्रथम 1772 मध्ये भारतात जिल्ह्याची निर्मिती केली.  'डिस्ट्रिक्टया घटकाकडे कायदा-सुव्यवस्था आणि महसूल वसुलीची जबाबदारी सोपवली. जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी 'जिल्हाधिकारी' वा 'कलेक्टर' पदाची निर्मिती केले  गेली. जिल्हा प्रशासनाचा घटक ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी तयार केलेला होता. ब्रिटिश कालीन पद्धती स्वातंत्र्योत्तर काळात भारताने चालू   ठेवली.

जिल्हा प्रशासनाचा अर्थ-

    जिल्हा शब्दाचे अनेक अर्थ विशद केलेले आहेत. चेंबर शब्दकोशात 'विभागाचा उपविभाग' तर ऑक्सफर्ड कोशात 'प्रशासनाचे  विशेष कार्य करण्याच्या हेतूने तयार केलेला विशिष्ट भूभाग' असे म्हटले आहे. जिल्हा शब्दाची नेमकी कल्पना येण्यासाठी पुढील व्याख्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

श्री.एस.एस.खेरा-जिल्हा प्रशासन हे लोकप्रशासनाचे एक अंग असून जिल्ह्याच्या मर्यादित कार्यक्षेत्रात ते कार्य करीत असते.

ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार-जिल्हा प्रशासन म्हणजे एका विशिष्ट भूभागात विशिष्ट उद्देश पूर्तीसाठी केले  जाणारे सार्वजनिक कार्याचे व्यवस्थापन होय.

डॉ.एम.पी.शर्मा-प्रशासनाच्या सोयीसाठी देशाचे लहान भागात केलेले विभाजन         म्हणजे जिल्हा प्रशासन होय.

पुले  बर्नेलजिल्हा हे एका प्रशासकीय व्यवस्थेचे नाव आहे. ज्यामध्ये संपूर्ण भारताचे विभाजन केलेले आहे.

        जिल्हा प्रशासन वैशिष्ट्ये-

     1. जिल्हा प्रशासन राज्य प्रशासन आणि स्थानिक प्रशासन यात  दुवा  म्हणून काम पाहते.

 2. एका जिल्ह्यात चार ते बारा तालुके असू शकतात. 600 ते  800 पर्यंतच्या गावांचा समावेश असतोलोकसंख्या साधारणता दहा ते वीस   लाखाच्या दरम्यान असतेलोकसंख्या आणि गावाचे प्रमाण निश्चित नसते.

      3. जिल्हा निर्माण करण्याचा अधिकार राज्य शासनाला असतोराज्य  शासन आपल्या सोईप्रमाणे जिल्ह्याची निर्मिती करत   असते.

    4.जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख असतोजिल्ह्यातील सर्व विभागावर त्याचे नियंत्रण असते.

        5.राज्यशासनाची सर्व कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात.केंद्राची काही कार्यालय जिल्ह्याचे ठिकाणी असतात.उदाआयकर विभाग

 6.पंचायतराज मधील जिल्हा परिषद नावाची संस्था जिल्हा   मुख्यालय स्थापन केलेली असतेजिल्हापरिषदेकडे विकास  योजनांच्या    अंमलबजावणीची जबाबदारी दिलेली असते.

 7.भारतात लोकसभा मतदार संघ निर्माण करताना जिल्हा    निर्वाचन क्षेत्र मानला जातो.

      8.जिल्हा सांस्कृतिक आणि सामाजिक ओळखीचे केंद्र मानला जातो.

        भारताचे प्रशासन केंद्र सरकार,राज्य सरकार तीन स्तरावरून  चालते.

       जिल्हा प्रशासनाचे अधिकार कार्य-

       केंद्र आणि राज्य प्रशासना खालोखाल जिल्हा प्रशासन महत्त्वाचे असते. जिल्हा प्रशासनाकडे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित असलेले अनेक विषय सोपवलेले असतात. जिल्हा प्रशासन हा केंद्र आणि राज्य यांना जोडणारा दुवा असतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाशी जनतेचा अत्यंत जवळचा संबंध असतो. जिल्हा प्रशासन अत्यंत महत्त्वाचे असून ही संविधानात त्याबाबत तरतूद दिसून येत नाही. जिल्हा प्रशासनाचे महत्व आणि उपयोगिता लक्षात घेऊन त्यांच्याकडे पुढील जबाबदाऱ्या सोपवलेले आहेत.

       कायदा सुव्यवस्था राखणे- कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य शासनाची असली तरी ती जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवली आहे. जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी हाच जिल्हा दंडाधिकारी असतो. जिल्हादंडाधिकारी या नात्याने कायदा सुव्यवस्था राखण्याचे उत्तरदायित्व त्याला जिल्हा प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने पार पडावे लागते. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी तो विविध प्रकारच्या उपायोजना करत असतो. उदा. जमावबंदी कलम लागू करणे. कायदा-सुव्यवस्थेच्या कार्यावर इतर कार्याचे यश अवलंबून असते.

       नागरी हक्क संरक्षण- संविधान आणि कायद्याने दिलेल्या नागरी हक्कांचा मुक्त आणि निर्भयपणे नागरिकांना वापर करता यावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला आहे. नागरिकांच्या अधिकारावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था यांच्याविरोधात जिल्हा प्रशासनाकडे दाद मागता येते. नागरी हक्क संरक्षणाबद्दल न्यायालय शासन आणि विविध   अभिकारणांनी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करत असते.

       महसूल प्रशासन- जिल्हा प्रशासनाची निर्मिती महसूल वसुलीसाठी केलेले आहे. राज्य शासनाने महसूल संकलनाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवलेली आहे. हे कार्य व्यवस्थितरित्या पार पडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यापासून ते तलाठी पर्यंतची यंत्रणा निर्माण केलेली आहेही यंत्रणा सर्व महसूल जमा करून शासकीय कोषागारात जमा करण्याचे कार्य करत असते. महसुली करासोबत सेवा आणि वस्तू कर, जमिनीच्या खरेदी विक्री वरील कर, मादक पदार्थावरील उत्पादन शुल्क, कृषी कर इत्यादी विविध करांची वसुली जिल्हा प्रशासन करत असते. महसूल इतर कर संकलनावर जिल्हाधिकाऱ्यांचे देखरेख नियंत्रण असते.   राज्य शासनासोबत केंद्र सरकारचे काही कर जिल्हा प्रशासन संकलित करीत असते.

       जनता आणि शासन यातील दुवा- जिल्हा प्रशासनाला जनता आणि शासन यातील दुवा म्हणून काम करावे लागते. शासनाकडून आलेल्या विकास कार्यक्रमांचे अंमलबजावणी करणे आणि जनतेकडून आलेल्या प्रतिक्रिया शासनाकडे पोचवण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असते.

        जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियंत्रण- जीवनावश्यक वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देणे हे जिल्हा प्रशासनाचे काम असते. रेशनिंगच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानदारांना उपलब्ध करून देते. जीवनावश्यक वस्तूची साठेबाजी आणि किंमत नियंत्रणावर लक्ष ठेवण्याचे काम जिल्हा प्रशासनाला करावी लागते. साठेबाजी आणि भेसळ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा अधिकार  वा धाडी टाकण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला असतो.

       कायद्याचे अधिराज्य निर्माण करणे- कायद्याचे अधिराज्य ही संकल्पना प्रा. डायसी यांनी मांडलेली आहे. या संकल्पनेच्या आधारावर कायद्याचे समान संरक्षण आणि समान पद्धतीने कायद्याची अंमलबजावणी हे तत्त्व अंमलात आणण्याची जिल्हा प्रशासनाची जबाबदारी असते. कोणत्याही प्रकारचा भेदभाव आणि पक्षपात करता कायद्याचे समान संरक्षण उपलब्ध करून देणे हे जिल्हा प्रशासनाचे काम  असते.

        नैसर्गिक संकटाचा मुकाबला करणे- भूकंप, पूर, दुष्काळ इत्यादी नैसर्गिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना जिल्हा प्रशासनाकडून केल्या जातात. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीची स्थापना केली जाते. नैसर्गिक संकटात मृत्युमुखी पडलेल्या किंवा मालमत्तेचे नुकसान झालेल्या व्यक्तींना मदत करणे. त्यांचे पुनर्वसन करणे हे कार्य जिल्हा प्रशासनाला करावी लागते.

       निवडणूक विषयक कार्य- जिल्हाधिकारी हा जिल्ह्यातला प्रमुख निवडणूक अधिकारी असतो. जिल्हा निवडणूक आयुक्त या नात्याने मतदार याद्याची पुनर्रचना करणे, विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणे, निवडणूक कामासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे, मतदार याद्या अद्ययावत करणे, निवडणूक कायद्याची अंमलबजावणी करणे, मतदान कार्यावर देखरेख नियंत्रण ठेवणे. मतमोजणी करून निकाल जाहीर करणे इत्यादी सर्व कार्य जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखालील चालत असतो.

        वित्तीय कार्य- जिल्हा कोषागार व्यवस्थेची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे असते. जिल्हा  कोषागार अधिकारी विविध प्रकारची कर वसुली करून कोषागारात जमा करून त्याबद्दलची माहिती राज्य शासनाला कळवतो. राज्य शासनाकडून आलेली रक्कम इतरांना वितरीत करण्याचे कार्य देखील जिल्हा कोषागार यंत्रणेमार्फत केले जाते.

       विकास विषयक कार्य- जिल्ह्यातील जनतेच्या विकासाची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवलेली असते. जिल्हा नियोजन समितीत जिल्हा विकासाचा आराखडा तयार केला जातो. जिल्हाधिकारी हा जिल्हा नियोजन समितीचा सचिव असतो. जिल्हा नियोजन समितीने मंजूर केलेल्या आराखड्यानुसार विकास कामाची अंमलबजावणी करणे हे जिल्हा प्रशासनाचे काम असते. तसेच केंद्रीय आणि राज्य कार्यकारी मंडळाने आखलेल्या विकासाच्या योजना अंमलात आणण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची असते.

        स्थानिक संस्थांवर नियंत्रण- लोकशाही विकेंद्रीकरणाचा उद्देशाने भारतात शहरी आणि ग्रामीण स्थानिक संस्था निर्माण केलेले आहेत. या संस्थांच्या कार्यावर जिल्हा प्रशासन नियंत्रण ठेवत असते. या संस्था योग्य पद्धतीने काम करत नसतील तर कार्यवाही करण्याचा, चौकशी करण्याचा वा निरीक्षण करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असतो.

       इतर कार्य- वरील कार्य शिवाय कृषी, शिक्षण, सहकार, आरोग्य, सिंचन, उद्योग इत्यादी क्षेत्राशी निगडित अनेक कार्य जिल्हा प्रशासनाकडे सोपवलेले आहेत. हे कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक साधन सामग्री जिल्हा प्रशासनाकडे दिलेली आहे.

वरील कार्याचा विचार करता जिल्हा प्रशासनाकडे अत्यंत व्यापक जबाबदाऱ्या सोपवलेल्या आहेत. कल्याणकारी राज्य संकल्पनेमुळे जिल्हा प्रशासनाच्या जबाबदाऱ्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य प्रशासनानंतर जिल्हा प्रशासन महत्त्वाचे मानले जाते.

 


 


 

  स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके-

Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gUFor more reading click following Link-https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/08/directive-principles-of-state.html स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त पुस्तके- Indian Polity - For Civil Services and Other State Examinations | 6th Edition-https://amzn.to/3AkhXPw VASTUNISTH: BHARAT KA ITIHAS; KALA EVAM SANSKRITI (Hindi Edition)-https://amzn.to/3AvC25g सेट/नेट राज्यशास्त्र पेपर-२-https://amzn.to/3CmgIkJ Samanya Budhi Avum Tarkshakti Parikshan-https://amzn.to/37yNIb0 Ksagar Sampurna Rajyashastra संपूर्ण राज्यशास्त्र-https://amzn.to/3AnWmFA विसाव्या शतकातील राजकीय विचारप्रवाह https://amzn.to/36LU5rh आधुनिक राजकीय विचारप्रणाली- https://amzn.to/3xpwU0R भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था पुस्तक link https://amzn.to/3iwtpjt https://amzn.to/3kMDY4U आधुनिक राजकीय सिद्धांत पुस्तक https://amzn.to/3BLcdQm महाराष्ट्रातील सामाजिक-राजकीय चळवळी आणि महाराष्ट्र प्रशासन Redmi Note 10 (Aqua Green, 4GB RAM, 64GB Storage) -Amoled Dot Display | 48MP Sony Sensor IMX582 | Snapdragon 678 Processor link- https://amzn.to/3xpahtm Canon EOS 1500D 24.1 Digital SLR Camera (Black) with EF S18-55 is II Lens-https://amzn.to/3AfUkax https://amzn.to/3iG9wXl-(boya Mic for good voice Quality for lecture and video) https://amzn.to/3y3Qr7Z (Adjustable Tripod and Stand ) https://amzn.to/36ZtgQy (Sony Camera) https://amzn.to/2UGoDbB (Dell MS116 1000DPI USB Wired Optical Mouse) Redmi note 10 amazon link-https://amzn.to/3y3e8gU Use Product video making- Mic: https://amzn.to/39WbfUO Tripod: https://amzn.to/2OKuBlF Camera: https://amzn.to/3uQFswU Laptop: https://amzn.to/3tieMEP Ring Light: https://amzn.to/32bpfGh Web Hosting Link: https://www.hostinger.in/vedant My Influencer Page:- https://goo.gl/8Tf2ya

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.