https://mahendrapatil1210.blogspot.com/2021/09/1986-environment-protection-act-1986.html

सामाजिक व राजकीय चळवळी ऱ्हासाची कारणे


 सामाजिक व राजकीय चळवळी ऱ्हासाची कारणे- 

  •       समाजातील महत्त्वपूर्ण घटक व्यवस्था यात समाज हिताच्या बाजूने बदल घडून आणण्यासाठी किंवा समाजविघातक बदलांना संघटित विरोध करण्यासाठी समाजातील असंख्य व्यक्तींनी एकत्र येऊन हेतुपुरस्कर केलेला प्रयत्न म्हणजे सामाजिक चळवळ होय.

          सध्या कामगार आहेत पण चळवळी दिसत नाही. चळवळीतून नवीन नेतृत्व उदयाला येताना दिसत नाही. सध्या काळात व्यापक विषयावर चळवळी करण्यापेक्षा छोट्या-छोट्या विषयांवर चळवळी सुरू झाल्याने त्यांच्याविषयीची अस्मिता कमी झाली.

          चळवळीच्या नावाखाली बिगर सरकारी संघटनांचे पीकच जोरात आलेले आहे.

           जागतिकीकरणाच्या उदयाने संपूर्ण भारतीय समाजाचे संदर्भ प्रश्न बदलले. जागतिकीकरणाच्या प्रभावाने क्रांतिकारी विचार बोथट झाल्यामुळे देखील चळवळी संपल्या. वाढत्या सामाजिक गतिशीलता मुळे संघर्ष नको सामोपचाराने रहा या विचारधारेने मुळे क्रांतिकारी जाणीवा बोथट होण्यास हातभार लागला.

          नेतृत्व  विचारप्रणालीचे उपयुक्तता संपल्याने  किंवा चळवळी उद्दिष्ट हीन बनल्यामुळे संपल्या.

          प्रामाणिक तळमळीच्या कार्यकर्त्यांचा अभावामुळे चळवळी संपल्या.

          प्रसिद्धी सत्ताप्राप्तीसाठी कणा नसलेली माणसं चळवळीत शिरल्याने  चळवळीच्या तत्वात काळानुरूप बदल केला नाही. कालबाह्य मागण्या घेऊन चळवळी सुरू राहिल्यामुळे चळवळी संपल्या.

          बदलते  जनमताचा कानोसा घेता आल्याने चळवळीची व्यवहार्यता संपून त्या इतिहासजमा झाल्या.

          चळवळीचे संदर्भ,नेतृत्व आणि प्रश्न बदलल्याने देखील चळवळी संपल्या .

          अनेक चळवळी भावनिकतेच्या बाहेर यायला तयार नसल्यामुळे देखील संपल्या.

          चळवळीच्या तत्वावर विश्वास नसलेली माणसे चळवळीत शिरली आणि त्यांनी चळवळ बळकाल्याने चळवळी संपल्या.

           चळवळीतील प्रमुख नेत्यांना दैवत्व बहाल करण्यात आले. चळवळीतल्या तत्त्वांकडे दुर्लक्ष करून नेत्यांचे गुणगान करण्याची स्पर्धा सुरू झाली.

          चळवळींचे संघटन जात, नातीगोती आणि धर्म या पारंपरिक परिघात अडकल्यामुळे चळवळीमध्ये कमालीचे साचलेपण आले आहे. चळवळीत समाजातल्या सर्व घटकांचे सामीलीकरण करून घेतल्यामुळे विशिष्ट गटाच्या हातात चळवळीची सूत्रे मक्तेदारी गेल्याने चळवळी संपल्या.

          वेळ, पैसा ज्ञान इत्यादी सामाजिक भांडवल लोक द्यायला तयार नसल्यामुळे चळवळी संपल्या.

          चळवळींचे राजकीय पक्षात रूपांतर झाल्यामुळे आणि चळवळीचे कार्यकर्ते अनेक राजकीय पक्षात शिरल्यामुळे चळवळी संपल्या.

     


     

     

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

If you have any donuts. Lets me Know.